Ad will apear here
Next
उद्योग संस्कार
सध्या सर्वत्र उद्योजकतेचे वातावरण आहे. नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायाकडे वळण्याचा सल्लाही अनेकदा दिला जातो. पण हे कसे शक्य होणार, असा प्रश्न पडू शकतो. म्हणूनच मुलांवर लहान वयातच उद्योगाचे संस्कार केल्यास त्यातून कमी वयात उद्योजक निर्माण होऊ शकतो, हा विचार देत विश्वास वाडे यांनी ‘उद्योग संस्कार’मधून छोटे छोटे मुद्दे स्पष्ट करत केला आहे.

उद्योजकतेची उपयुक्तता, महत्त्व, माहिती, पाठिंबा, मदत, प्रोत्साहन या गोष्टी यातून मिळतात. गॅझेटमध्ये अडकलेल्या मुलांना फिरायला बाहेर घेऊन जाणे, हा उद्योजकीय संस्कारातील पहिला धडा आहे. यातून मुलांना आभासी जगापेक्षा वास्तवतेचे भान येते. प्रत्यक्ष जगात वावरण्याचे ज्ञान मिळते, आत्मविश्वास वाढतो.

या पहिल्या धड्यानंतर मुलांना त्यांच्या चांगल्या कल्पनांवर काम करायला प्रवृत्त करणे, जबाबदारी घ्यायला लावणे, पॉकेट मनी देण्यापेक्षा ते पैसे कमवायला लावणे, पैशाची बचत व महत्त्व सांगणे, सुटीत छोटे व्यवसाय करायला लावणे आदी ३२ संस्कार यात सांगितले आहेत. हे संस्कार देताना त्यामागील भूमिका, लाभही दिले आहेत. तसेच, स्वध्यायासाठी कोरी जागाही ठेवली आहे.

पुस्तक : उद्योग संस्कार
लेखक : विश्वास वाडे
प्रकाशक : संधिकाल प्रकाशन
पाने : १४०
किंमत : १५० रुपये

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXYBW
Similar Posts
उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं उद्योग असो वा नोकरी काम करताना चुका होताच राहतात; पण अशा चुकांमधूनच धडा घेऊन यशाच्या शिखराकडे जाता येते. विश्वास वाडे यांनी या पुस्तकात एखाद दुसऱ्या नव्हे, तर तब्बल १४० चुका सांगितल्या आहेत. व्यवसाय तर करायचाय, पण नियोजनच नसेल, तर कष्टावर पाणी फिरायला वेळ लागत नाही, किंवा स्वतःच्या क्षमता-कमतरतांची माहिती
सासू सुनेची संपूर्ण चातुर्मास मेन्यू डायरी आषाढी शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या काळास चातुर्मास म्हटले जाते. या चार महिन्यांस धार्मिक महत्त्व आहे. या काळात अनेक सणवार येतात. उपवासही असतात. अनेक जण कांदा, लसूण खाण्यातून वर्ज्य करतात. अशा वेळी कोणते पदार्थ करता येतील याची माहिती व पाककृती शीला बारपांडे व प्रणाली बारपांडे यानी ‘सासू सुनेची
हीलिंग : एक प्रकाशवाट स्वास्थ्य राखण्यासाठी मन व शरीर दोन्ही तंदुरुस्त असावे लागते. आपल्याला होणारे बहुतांश रोग मनाचे स्वास्थ्य हरविल्यानेच होतात. म्हणूनच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य संतुलित ठेवण्यासाठी हीलिंग ही उपचारपद्धती उपयुक्त ठरते, असे विचार मांडून वृषाली लेले यांनी ‘हीलिंग : एक प्रकाशवाट’ या उपचारपद्धतीचे काम कसे
जीवन समजून घेताना आपले वैयक्तिक आयुष्य, आपले नातेसंबंध, आपले कार्यक्षेत्र आणि आपले सामाजिक योगदान या जीवनाच्या चार महत्त्वाच्या भागांमध्ये समतोल साधता आल पाहिजे, असे गौर गोपाल दास यांनी म्हटले आहे. यानुसार ‘जीवन समजून घेताना...’ मधून मन:शांती, सुदृढ नाती आणि संतुलित आयुष्याचे रहस्य त्यांनी उघड केले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language